महिलेने बसमध्ये बसायला थोडीशी जागा मागितली या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीने पुढे केले असे काही की काय केले, वाचून आश्चर्यच वाटेल..

जरा हटके

MastMarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्यापेजला नक्की लाईक करा. नमस्कार, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृदयस्पर्शी कथा. आणि लेखन केले आहे आदरणीय स्वप्ना मुळे यांनी.  “काय बिघडतं हो थोडी जागा दिली तर?.. रोज मी तुमच्या मागच्या स्टॉपवर चढून आधीच बसलेली असते बघता ना तुम्ही रोज,… “बसलेला गृहस्थही तश्याच रोखात म्हणाला, “हो आणि आम्ही रोज उभे असतो पण तुम्ही थोडं सरकुन जागा देत नाही आम्हाला,.. “त्याच्या या वाक्यावर फणकाऱ्याने वळत ती दुसरीकडे जागा शोधायला लागली,.. तसा वसु मावशीने तिला ईशारा केला.

ये इथे ऍडजस्ट होऊ,….. “अरे वा आपल्या मैत्रिणीची आई भेटली बरं झालं” असं मनात म्हणत ती पर्स आणि तोल सांभाळत मागे आली,.. वसु मावशी जरा सरकली हे खिडकीतल्या माणसाला आवडलं नाही,.. त्याने तसं चेहऱ्यावर स्पष्ट दाखवलं,..टेकायला मिळालं ह्या आनंदाने अनु बसली,.. पर्समधली बाटली काढून गटागटा पाणी पिलं,.. तोंड पुसत वसु मावशीकडे वळत म्हणाली, “काहो मावशी आठ दिवसांपूर्वी मनीकडे आला होतात आणि लगेच निघालात? आता कुठे दौरा,..?” वसुमावशी हसत म्हणाली,”आता दौरा आम्ही पूर्वी चाळीत राहायचो त्या शेजाऱ्यांची सुमी बाळंतीण झाली तिच्याकडे पुण्याला,..

“हे ऐकून अनु म्हणाली, “अहो मनीकडे वास्तुला आला होतात ना,.. मग भरपूर राहायचं ना निवांतपणे लेकीकडे,.. माझी आई तर बघा कुठे जात नाही,.. आणि खरं म्हणजे आईला आणि बाबांना माझ्या शिवाय कोणी बोलवतही नाही,.. आई मध्ये आली तेंव्हा तिने आठवण काढली होती तुमची मनीकडे म्हणाली,”तुझ्या आईला बरे बाई सगळे बोलावतात.. आम्हाला मेल एक घर नाही कुठे जाऊन असं रमायला,.. तेंव्हा तुमची मनी सांगत होती,..” आई खुप डिमांडेड पर्सन आहे म्हणून,.कोणाचे लग्नकार्य,मुंजी,वास्तू, दुखणेखुपणे,बाळंतपण काहीही असलं की सगळ्यांना वसु मावशी हवी असते आणि हे असलं नसलं तरी तिला सगळे बोलवत असतात,..

“त्यावर माझी आई म्हणाली होती, “तिने जपलेत सगळे लोकं आयुष्यात आलेले,.. काळ बदलला,सगळ्यांची आर्थिक परिस्थिती बदलली पण वसुची वागण्याची पद्धत नाही बदलली ती आजही पूर्वीसारखी हक्काने जाते राहते तिला एकच मुलगी असली तरी हक्काची घरं अनेक आहेत आपल्या सारखं नाही चार पोरं पण कोणी विचारत नाही,..” मावशी आईचं वाक्य ऐकल्यावर मी देखील विचारात पडले होते की, “एका माणसाला एवढी मागणी कशी असू शकते हो,..?” वसु मावशी स्वतःच्या मांडीवरची पिशवी सावरत म्हणाल्या,..”अनु तुझा थोडा वेळापूर्वीचा प्रसंग बघ तू नेहमी ह्या बसने ये जा करतेस,..

बरेच चेहरे तुझ्या ओळखीचे आहेत पण आज तू तुझ्या नेहमीच्या स्टॉपपेक्षा नंतरच्या स्टॉपवरून चढलीस तर तुला जागा दयायला कोणी तयार नाही ए,.. कारण साधं आहे ना तू कोणासाठी जागा निर्माण करत नाहीस,… खरंतर हे व्यवहारी जग आहे पण हा असा नियम आपल्या आयुष्यात तंतोतंत लागू होतो,.. तुम्हाला अश्या जागा ह्या फार आधीपासून निर्माण कराव्या लागतात आपल्या मनामध्ये,.. मग कधी त्या मदतीच्या स्वरूपाने,कधी पैशाने,कधी प्रेमाने ,कधी आदराने कधी मैत्रीने अश्या अनेक रोपांना रुजवावं लागतं माणसाच्या मनात मग तिथे आपुलकीची रोपं उगवायला लागतात,….

आपण आपल्या आयुष्यात कितीही मग्न असलो तरी ह्या रोपांना अधून मधुन बघावं लागतं,.. कधी हलकीशी भेट,कधी संवादाचं खत घालत राहावं लागतं,..पण हे सगळं करताना एक नियम मनाला पक्का सांगावा लागतो,.. मला त्या रोपांकडून फुला फळाची अपेक्षा नाही,.. ही माणसाची शेती माझी निरपेक्ष आहे,.. प्रेमाने आणि आनंदाने ही रोपं वाढू द्यावी,.. ह्याचे कधी वटवृक्ष होतात ते कळतही नाही,.. पण खरा आनंद मिळतो जेंव्हा त्यांच्या सावलीत त्यांच्या सहवासाची जागा आपल्यासाठी राखुन ठेवलेली असते,.. कुठे बहीण म्हणून,कुठे मावशी, आत्या, काकु, मामी, कुठे ताई, कुठे आजी देखील अश्या अनेक भूमिकांची जागा जेंव्हा.

आपली वाट बघत असते ना तेंव्हा खरं आयुष्यच सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि आपण त्या जपल्या तर आपल्याही लेकरांना मावश्या,मामा, आत्या हक्काने मिळतात नाहीतर ती ही पुढे चालून एकटी पडतात,…. ह्यात कोणी नाही बोलवलं तर रागही नाही कारण त्याच्या घरात जागा नसली तरी मनात ती असतेच,.. पण अनु ह्या जागा बनवण्याचं वय हे खरं तरुणपणीचं,.. कारण तेंव्हा रुजवलं तरच ह्या सावलीच्या जागा आपली वाट बघत असतात.. मग माझ्या सारख्या एकटीला आयुष्य एकटं वाटत नाही,.. काही नियम मी स्वतः घालून घेते,..ह्या जागेतल्या सावलीचा थंडावा त्या जागेला कळू देत नाही,..

म्हणजे कोणतीही जागा आपल्या स्वभावाने दूषित व्हायला नको कारण निर्माण केलेल्या ह्या जागा जोपासताही आल्या पाहिजे,.. कधी त्या जागेत ऍडजस्ट करावं लागतं ते ही जमलं पाहिजे,.. आता आपण तिघांनी केलं तसं,.. नाही का हो?? वसु मावशी शेजारच्या माणसाकडे हसत म्हणाली,.. तसा तो आणखी पलीकडे सरकुन म्हणाला,.. “मावशी बसा व्यवस्थित होतो तिघे ऍडजस्ट,.. अहो तुम्ही एवढ्या सुंदर आयुष्यातल्या जागा सापडून दिल्या खरंच आजचा प्रवास मनात नवीन जागा निर्माण करणारा ठरला,.. आणि हे शिकवणारही की माणसाला जागा घरात, प्रवासात किंवा मनात कुठेही मिळाली तरी ती माणसं जोडणारीच असते,..

मावशी म्हणाली, “अगदी खरं बोललात,.. तेवढ्यात स्टॉप आला आणि मावशी उतरली,.. अनुने हाताने ती दिसेनाशी होई पर्यंत तिला टाटा केला,.. तिला जाणवलं मावशी बोलल्या ते अगदी खरं होतं,.. आपली आर्थिक परिस्थिती छान होती त्यामुळे आईने कधी कोणाला जवळ फिरकू दिलं नाही,.. पोरांना तर नुसतं वाऱ्यावर सोडलं होतं ती गुंग होती तिच्याच भौतिक सुखात आणि आता कोणी तिला बोलवत नाही तेच वसु मावशी गरिबी असुनही ही माणसांची श्रीमंती तिने कमवून ठेवली कारण तिने तेंव्हा घरात जागा नसली तरी मनात जागा दिली होती प्रत्येकाला,.. अनुच्या मनात आलं आता आपला आयुष्याचा पुढचा प्रवास.

वसु मावशी होण्याचाच कारण एकवेळ जगात राहायला जागा सहज मिळते पण माणसाच्या मनात ती मिळवावीच लागते,. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Source :- RoyalMarathi.com

Leave a Reply

Your email address will not be published.